आज पुन्हा आठवणी आल्या
पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या
सुनं आकाश चांदण्यांनी भरुन आलं
वेड मन पुन्हा भुतकाळात रेंगाळलं
आठवाणींची सोबत आहे म्हणुनच
दुःखातही चेहऱ्यावर हसु उमटतं
काळ कितीही पुढे सरकला तरी
क्षणभर थांबुन मागे वळाता येतं
जी माणस हवी-हवीशी वाटतात
ती नेहमी आठवणीत साठवली जातात
सार जग पोरक्या नजरेने पाहत
तेव्हा मनात तिच आठवली जातात
साऱ्या क्षणांना मला जपावास वाटत
मनाच्या एका कोपऱ्यात ठेवावस वाटत
म्हणजे हव तेव्हा मला तिथे जाता येईल
त्यांना कुशीत घेऊन थोडस जगता येईल
--चित्रा
No comments:
Post a Comment